Saturday, 19 October 2013

तु पुन्हा केव्हा येणारेस????

उदास संध्याकाळी मनात होते असंख्य विचार
आठवणींच्या लहरी उठताच उरात उठल्या कळा...

साता-जन्माची साथ करणार होतास ना रे तु?
अचानक न बोलता कसा गेलास तु?

मोह उरलाच नाही का आपल्या प्रेमाचा
गंध नसेल पण रंगाच वरदान आहे मला....

मनाशी जुळ्लेल्या मनाच नात असचं का तोडुन जाणारे
एवढ तर सांगुन जा या सगळ्या प्रश्नांची उत्तर द्यायला तु पुन्हा केव्हा येणारेस???

तु पुन्हा केव्हा येणारेस????

********मैत्री तुझी नी माझी*************



ठरवल आहे मनाने, करुया आपणही कविता आपल्या मैत्रीवर
मग मनानेच पुन्हा मनाला विचारलं
कि या मैत्रीचा अर्थ तरी काय ???
या स्वार्थी जगात तुझ्या मैत्रीचा उपयोग तरी काय ?
नसतो फक्त इथे फक्त उपयोग असते जीवाभावाची साथ......

मैत्री म्हणजे त्यागाची भावना,नात्यातील ताजेपणा
मानातील मांगल्य,ओठावरील हसु आणि डोळ्यातील आनंदाश्रु
मैत्रीच्या भावना जपायलाही लागते तितकच कोवळ मनं
कारण या कोवळ्या मनातच उमलते मैत्रीची नाजुक कळी.........

अखेर नैत्री तुझी नी माझी ,सार्‍या जगाहुन निराळी
नाही याला कसला स्वार्थ
कारण मैत्रीत नसतो कधी पैशांचा बाजार
इथे असतो फक्त भावनांचा आधार.......
आधार असतो एकमेकांचा प्रत्येक क्षण जगण्याचा
जगलेले प्रत्येक क्षण अनुभवण्याचा
असेलही बरेच मित्र ,मैत्रीणी तुझ्या
पण मी निराळी नक्कीच कुणी नसेल.......